*धूपबत्ती – अगरबत्ती – उदबत्ती*
पहिला प्रश्न धूप देवाला का?दाखवतात?
कोणतीही उपासना – प्रार्थना करताना मन प्रसन्न असणे आवश्यक आहे. त्याकरिता वातावरण प्रसन्न – शुद्ध होण्यासाठी धूप दाखवतात. त्याबरोबरच वातावरणातील सूक्ष्म जीवांचा त्रास होऊ नये, हवा शुद्ध रहावी म्हणून धूप दाखवतात. परमेश्वराने निर्माण केलेल्या सुगंधी वनस्पतींचे रस व वशिंड असलेल्या गाईचे (सुयकेतु नाडी) गोमय ज्यातून शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) निर्माण होतो ही धारणा धूप दाखवण्यामागे असते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे
वनस्पती रस व अग्नीचा संयोग होवून पृथ्वीलोकातून सप्तलोकात साधकांचे अनुसंधान होण्यास मदत होते.
अगरबत्ती म्हणजे अगर नावाच्या झाडाचा डिंक घालून केलेला धूप. उदबत्ती म्हणजे विविध सुगंधी वनस्पतींचा रस (डिंक) घालून केलेला धुप. परंतु आता अगरबत्ती म्हणजे बांबूची काडी, कोळसा व केमिकलचा नकली सुगंध! त्याने शरीराची व निसर्गाची हानी होत आहे. आपल्या ऋषी मुनींनी बांबू न जाळण्याचे सतत सांगितले आहे. बांबू मध्ये ओझोन वायू असतो. त्याचा व अग्नीचा संयोग होऊन वातावरणातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) संतुलन बिघडते. कोळसा जाळल्याने प्रचंड कार्बन डायऑक्साइड निर्माण होऊन प्रदूषण होते. त्यावर केमिकलचा नकली सुगंध – त्याने शरीरावर गंभीर परिणाम होतात. नैसर्गिक सुगंधाची अगरबत्ती प्रचंड खर्चिक होईल; म्हणून लोकांना परवडत नाही.
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मानव कल्याणासाठी जय गोमाता जय गोपाल गोशाळेने १००% शुद्ध धूपबत्ती बनवली आहे. सर्वांना सहज लाभ व्हावा म्हणून ना नफा ना तोटा व काही भगवत् भक्तांच्या आर्थिक साहाय्याने फक्त दहा रुपयात उपलब्ध केली आहे.