II रामनामं विजयते II

जय गोमाता जय गोपाळ गोशाला – निसर्गोपचार पद्धती

या थेरपीत कोणत्याही आजारचं औषधं पोटातून न घेता विविध तेलांमधून आजारानुसार तळपाय, तळहात, नाभी, मस्तक यांना लावून व त्याबरोबरच त्या त्या आजाराच्या मुद्रा व प्राणायाम केल्याने कोणताही आजार रुग्णाला सांगितलेले सर्व उपचार व नियम काटेकोरपणे, संयमाने अंगिकारल्यास आजार पूर्णपणे आटोक्यात व पूर्णपणे बरा होऊ शकतो.

या थेरपीत विशेष करून विविध वनस्पतींचे योग्य नक्षत्रांवर तयार केलेले भस्म, त्याच बरोबर तळहात व तळपायांचे योग्य ॲक्यूप्रेशर पॉइंट्स यानेच थेरपी पूर्ण होते. पोटात घेतलेली औषधं व खाण्यापिण्याचे इतर पदार्थ यांचा संयोग होऊन भलतेच आजार निर्माण होतात. इंग्रजी औषधांमध्ये सतत औषध घेतल्याने काही वर्षांनी अवयवही निकामी होतात. सर्व आजारांच मूळ आपली अयोग्य जीवनशैली व रसनेवर (जीभेवर) नसलेला संयम हे आहे.

निसर्ग शक्तीने प्रत्येक वनस्पतीला वेगळ्याप्रकारची आजार बरे करण्याची विशिष्ट तत्वशक्ती दिली आहे. त्या वनस्पतीचा योग्य नक्षत्रांवर अग्निशी संयोग झाला असता सूक्ष्म असे औषधं निर्माण होते. ही औषधे तीळ, मोहरी, बदाम, खोबरे व इतर तेलांमधुन वापरल्यास फार मोठा सकारात्मक परिणाम मिळतो.
आपल्या हातात व तळपायात विश्वातील सर्व आजार निवारण करण्याचे सामर्थ्य निसर्गाने दिले आहे. हल्ली बहुतेक लोकांना सतत गोळ्या – औषधं घेऊन झटपट बरे होण्याचे वेध लागलेले असतात. परंतु ही औषधे एक आजार बरा करतात व अपचनाद्वारे दुसरे रोग निर्माण करतात.

पुरेशी झोप, योग्य आहार व योग्य प्राणायाम मनुष्याला निरोगी दीर्घायू करतो. आळस व कंटाळा केल्याने आयुष्याची हानी होते. कोणत्याही क्षेत्रात यश संपादित करायचे असेल तर योग्य दिशेने सतत मेहनत व प्रयत्न करावेच लागतात. या थेरपीमध्ये रुग्णाला स्वतःसाठी खालीपोट वेळ देणे यानेच रुग्ण बरा होतो.

आपण सर्वांनी सुती कपडे वापरणे. कोणत्याही पावडर, डीयो किंवा कॉस्मेटिक्स् वापरणे हे धोकादायक आहे. आहारात तळलेले पदार्थ जर एकाच तेलात पाच – सहा वेळानंतर बनवलेले असतील तर ते अन्न जगातील सर्वात जहाल विष होते. उदा. सकाळी लवकर उठायचे असेल तर तुम्हाला रात्री लवकर झोपायलाच पाहिजे. जर तुम्ही लवकर झोपला नाहीत तर अपुऱ्या झोपेमुळे तुम्ही विविध आजारांना आमंत्रण देता. अर्धवट माहितीचे सर्वात मोठे हानीचे उदाहरण म्हणजे सकाळी तोंड न धुता पाणी पिणे. जर तुम्हाला दातांचे किंवा तोंडाचे काही आजार असतील तर हे पाणी पोटात गेल्याने नको ते त्रास व आजार उद्भवतात. अशा अनेक गोष्टी नकळत व अज्ञानाने झाल्याने विविध रोगांना आपण स्वतः आमंत्रण देतो.

या निसर्गोपचार थेरपिच्या माध्यमाने लोकांमधील अज्ञान व रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नियम व संयम अंगिकारून निरोगी होयचे असल्यास त्यांनीच या थेरपीचा वापर करावा. तात्पुरता दिलासा हा या थेरपीचा उद्देश नाही.