II रामनामं विजयते II

जय गोमाता जय गोपाळ गोशाला – निसर्गोपचार पद्धती

जय गोमाता जय गोपाल गोशाला म्हणजे निराधार व शेतकऱ्यांना सांभाळायला कठीण अश्या भाकड गायींसाठी व गोवंशासाठी हक्काचं स्थान होय.

जगत् कल्याणी गोमातेची सेवा करण्याची सद् बुद्धी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ (परेल एसटी डेपो मागे,मुंबई) या मठाचे संस्थापक योगमहर्षि श्री आनंदसरस्वती महाराज यांना झाली. या गोशाळेचा सर्व खर्च श्रीमहाराज कोणतेही डोनेशन न घेता स्वतः करतात. गोशाळेची जागा व इतर बांधकाम श्रीमहाराजांनी स्वखर्चाने केले आहे.”कोणतीही गोशाळा समाजावर आश्रित न राहता स्वयंपूर्ण झाली पाहिजे”,हा श्रीमहाराजांचा विचार आहे. या विचारानेच या गोशाळेची स्थापना श्रीमहाराजांनी केली आहे.

सध्या अन्न व पाणी बरेच दूषित झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने माती अत्यंत निकृष्ट झाली आहे. हे रासायनिक पदार्थ भूगर्भात खोलवर गेल्याने पाणीही दूषित झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दुर्धर आजार व त्या आजारांमागे होणारा औषधांवर खर्च. या सर्वांवर उपाय म्हणजे गोमय व गोमूत्र होय.

“धेनुचं धरत्रीला तारू शकते”व “आपल्या प्रत्येकाचे आरोग्य आपल्याच हातात असते”,असे श्रीमहाराजांचे सांगणे आहे. गोमाता वृद्ध जरी झाली तरी तिच्या गोमुत्राने व गोमयाने भूमी पवित्र होऊन मानवजातीस उपकारक ठरते. या यांत्रिक युगात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने व उपायाने माती, पाणी, हवा व शरीर शुद्ध होऊ शकत नाही. म्हणूनच गायीला जगत् माता म्हणतात. निराधार व अपंग गोवंशाची अवहेलना न करता त्यांचा सांभाळ करून आपण आपल्यावरच उपकार करतो. “गोवंशाचा सांभाळ व सेवा करताना पुण्य, धर्म या गोष्टींचा विचार न करता ही सेवा मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, हे समजून – उमजून हे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे”, ही शिकवण श्रीमहाराज देत असतात. प्रत्येकाने तन – मन – धन देऊन गोवंशाची जमेल तशी सेवा केलीच पाहिजे.

कमी खा पण शुद्ध खा. नको त्या गोष्टीवर खर्च न करता शुद्ध अन्नावर खर्च करणे ,हे गरजेचे आहे. अन्न तसे मन – मन तसे बुद्धी व बुद्धीनेच आर्थिक प्रगती होते. ९०% आजार हे लाईफस्टाईल मुळेच होतात. याच सर्व विचारांचा प्रसार – प्रचार श्रीमहाराज करत असतात.

ही गोमातेचे सेवा श्रीमहाराज स्वखर्चाने करतायत,परंतु कोणालाही या गोसेवेत सहभागी व्हायचे असल्यास त्या प्रत्येकाचं स्वागतच आहे.श्रमाने, वस्तूरूपाने किंवा आर्थिक मदतीने या गोसेवेत कोणीही सहभागी होऊ शकत.

आमच्या विषयी

या थेरपीत कोणत्याही आजारचं औषधं पोटातून न घेता विविध तेलांमधून आजारानुसार तळपाय, तळहात, नाभी, मस्तक यांना लावून व त्याबरोबरच त्या त्या आजाराच्या मुद्रा व प्राणायाम केल्याने कोणताही आजार रुग्णाला सांगितलेले सर्व उपचार व नियम काटेकोरपणे, संयमाने अंगिकारल्यास आजार पूर्णपणे आटोक्यात व पूर्णपणे बरा होऊ शकतो.

20220702161412_IMG_1834